देशाला भक्कम नेतृत्व नाही - इनामदार (27-04-2010 : 8:34:21) |
नवी मुंबई, दि. २६ (प्रतिनिधी) - हजार मेंढ्यांचे नेतृत्व जेव्हा सिह करतो, तेव्हा त्या हजार मेंढ्या सिहासारख्या असतात. मात्र हजार सिहांचे नेतृत्व जेव्हा एक मेंढी करते, तेव्हा ते हजार सिह मेढ्यांसारखे वागतात. दुर्दैवाने आपल्या देशाचेही काहीसे असेच झाले आहे. कारण आपल्याकडे भक्कम नसलेले नेतृत्व, असे परखड मत राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविद इनामदार यांनी व्यक्त केले. वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात शनिवारी सर्जेराव कुइगडे लिखित 'मुंबई २६/११ एक हादसा' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी इनामदार यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकासाठी त्यांनी प्रस्तावना लिहिली असून प्रस्तावनेत त्यांनी देशातील विविध समस्यांवर प्रकाश टाकला आहे. या देशाचे नेतृत्व कसे असावे याबाबत बोलताना इनामदार म्हणाले की, देशाचे नेतृत्व हे शिवाजी महाराजांसारखे असावे. पुण्यातील जर्मन बेकरीतील स्फोट, अक्षरधामवरील हल्ला, ओरिसामधील नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या लुटलेल्या रायफली, १९४८ मध्ये ६ हजार पाकिस्तान्यांनी केलेली घुसखोरी आदी घटना आमच्या देशात घडल्या. तरी आजही आमची तयारी चालूच आहे, देशाचे दुर्दैव म्हणजे आम्ही आताही जागे झालेलो नाही, कारण आजही आपण या घटना गांभीर्याने घेतल्या गेलेल्या नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पोलिसांना आपण नेहमी सुधारा, असे म्हणतो. या देशातील नेत्यांना आधी सुधारा, मग पोलीस आपोआप सुधारतील. कारण माणूस जेवढा मोठा तेवढा कायद्याची पायमल्ली जास्त करत असल्याकडे इनामदार यांनी लक्ष वेधले. पाश्चात्त्य देशात केलेल्या चुकांची मांडणी केली जाते, त्यामुळे पुढच्या वेळी त्या चुका टाळण्यास मदत होत. मात्र आपण केलेल्या चुकांची मांडणी केली जात नाही आणि त्याच चुकांची पुनरावृत्ती होत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष सी.बा. अडसूळ व त्यांच्या पत्नी शारदा अडसूळ, डॉ. पल्लडवाड, पुस्तकाचे लेखक सर्जेराव कुइगडे, मंडळाचे कार्यवाह सुभाष कुळकर्णी आदी मान्यवरांसह नवी मुंबईकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. |
Wednesday, April 28, 2010
LOKMAT Review
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment